पेण । पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पाचे काम 2009 साली सुरु झाले. सध्या धरणाचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु 17 वर्षे होऊनही बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत.
मुंबई । एसटी कर्मचार्यांची दिवाळी गोड होणार असून राज्य सरकारने त्यांच्यासाठी 6 हजार रुपयांच्या बोनसची घोषणा केली आहे. त्याचसोबत कर्मचार्यांना 12 हजारांची उचलही घेता येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कर्जत । तालुक्यातील अंजप गावात विजेच्या वाहिनीचा धक्का लागून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, महावितरणच्या निष्काळजीमुळे केवळ चार महिन्यांत चौघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकारानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष उसळला असून, मृतदेह उचलण्यास त्यांनी नकार दिला आहे.
कर्जत । तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्यांचे लेखी आदेश काढूनही त्यांना हजर केले जात नसल्यामुळे कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला आहे.
अलिबाग । रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचे अंतिम आरक्षण जाहीर झाले आहे. जिल्ह्यातील एकूण 59 निवडणूक विभागांसाठी हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तब्बल 30 जागांवर महिला उमेदवार असणार आहेत.
कर्जत | कर्जत तालुक्यातील धाकटे वेणगाव येथे पहाटे घरात घुसून धारदार शस्त्र, पिस्तूल व रॉडने हल्ला करून कुटुंबातील चार जणांना गंभीर जखमी केले होते, याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंदवला आहे. घटना प्रतीक शिंदे (वय २८) यांच्या घरात घडली.
नवी मुंबई | नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिवाळीच्या काळात आकाशकंदील हवेत सोडणे, विक्री करणे व साठा ठेवणे बंदी घालण्यात आली आहे.
मोहपाडा | खालापूर तालुक्यातील मोहापाडा परिसरात ‘भीशी’ व उच्च व्याजदराच्या स्कीमच्या नावाखाली एका महिलेने १०० हून अधिक खातेदारांची सुमारे १.६८ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये बहुसंख्य खातेदार महिला आहेत. तक्रारीनुसार, संशयित महिला महिन्याला ५ टक्के व्याज दराचे आमिष दाखवून पैसे उकळत होती.
माणगाव | माणगाव पोलीस ठाणे हद्दीत टेंडर मिळवून देण्याचे वचन देऊन १४ लाख ९० हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतले, परंतु वर्कऑर्डर दिली नाही; याप्रकरणी ३ ते ४ भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई । बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. याच कार्यक्रमात मुंबईतील मेट्रो-3 आणि मेट्रो-2 बी या मार्गांचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.
उरण । उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग प्रकल्पात सोमवारी (8 सप्टेंबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या प्रचंड स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला. स्फोटानंतर क्षणार्धात आगीचे तांडव पसरले, तर नागावसह आसपासच्या वस्त्यांमध्ये घरांच्या काचा फुटल्या व नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.
21.1k
अलिबाग | रायगड पोलीस विभागाची प्रतिमा मलिन करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागणार्या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. आरोपी हवालदाराने पहिल्या हप्त्यापोटी ३ लाख रुपये स्वीकारताना महाड शहरात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
मुरुड । भाजपची मुरुड तालुक्याची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली. त्यामुळे या तालुक्याची जबाबदारी काही काळासाठी पक्षाचे जिल्ह्यातील नेते सतीश धारप यांच्यावर सोपवण्यात आली आहे अलिबाग-मुरुड विधानसभा निवडणुकीपासून संघटनेत विस्कळीतपणा आला होता.
माणगाव | मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर बायपास कामांच्या भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेतून मंत्री भरत गोगावले यांचे नाव वगळले गेले. यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात पुन्हा वाद पेटला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील रखडलेल्या बायपास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शुक्रवारी (३ ऑक्टोबर) आयोजित करण्यात आला होता.
धाटाव । मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक जिल्ह्यांतील गावांचा संपर्क तुटला आहे. सोलापूर, माडा तालुक्यातील लहूगाव व धाराशिव या भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेकडो नागरिक पूरात अडकले आहेत.
रोहा | रोहा नगरपरिषद हद्दीतील म्हाडा वसाहतीसमोरील वादादीत टपर्या अखेर बुधवारी (२० ऑगस्ट) जमीनदोस्त करण्यात आल्या. पोलिसांच्या संरक्षणात सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कारवाई केली. म्हाडा वसाहतीचे शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरले होते.
श्रीवर्धन । यावर्षी कोकणातील पावसाळ्याने विक्रमी सुरुवात केली. साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाळ्याला सुरुवात होत असते, मात्र यावर्षी 20 मे रोजीच पावसाने हजेरी लावल्याने पर्यटन हंगामावर मोठा परिणाम झाला असून हॉटेल, कॉटेज व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले.
श्रीवर्धन । तालुक्यातील नानवली समुद्र किनार्यावर तब्बल 11 किलो 966 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ आढळून आला असून दिघी सागरी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थ मासेमारीसाठी गेले असता किनार्यावर एक संशयास्पद गोणी आढळून आली.
म्हसळा | तालुक्यातील खरसई गावातील भावेश जनार्दन म्हसकर यांनी शिक्षण क्षेत्रात एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास आता देशातील सर्वोच्च व्यवस्थापन संस्थांपैकी एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) उदयपूर येथे पोहोचला आहे.
म्हसळा । म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. यामध्ये नगराध्यक्षपदी नगरसेविका फरीन अ. अजीज बशारत तर उपनगराध्यक्षपदी नगरसेवक अनिकेत पानसरे यांच्या नावाची घोषणा उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी जाहीर केली.
पेण । रायगड जिल्हा पोलीस दलाची सुत्रे हाती घेतल्यानंतर गुन्हेगारांना भांगडा करायला लावणार्या रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल पेण येथील श्री अंबिका माता मंदिरात गरबा खेळताना दिसल्या. आँचल दलाल यांचे हे वेगळे रुप पाहून नागरिकांनाही सुखद धक्का बसला.
पनवेल | पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग प्रारूप संदर्भात घेण्यात आलेल्या २८२ हरकती आणि सूचना फेटाळण्यात आलेल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून यासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता प्रभाग निश्चित झाले असून त्यांची हद्द ठरलेली आहे. परिणामी इच्छुकांना तयारी करण्यासाठी आता बर्यापैकी चित्र स्पष्ट झालेले दिसून येत आहे.
पनवेल । पनवेल परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन व्यक्ती ठार आणि दोन जखमी झाल्याची घटना घडली आहे. पहिला अपघात कर्नाळा घाटातील मुंबई-गोवा महामार्गावर आणि दुसरा पनवेल- उरण मार्गावर झाला.
सुधागड-पाली । सुधागड तालुक्यातील खेमवाडी येथील भगवान खताळ यांचे वारस झोरे कुटुंबियांनी आपल्या पूर्वजांचे घर खेमजाई नवतरुण मित्रमंडळ, खेमवाडी या सार्वजनिक मंडळाला दान करून अनोख्या दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. या उपक्रमामुळे गावकर्यांना विविध धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यासाठी हक्काची जागा मिळाली आहे.
वाघोशी । सुधागड तालुक्यातील पाली पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई करत मेढ्यांच्या झुंजीच्या नावाखाली चालणारा अवैध सट्टा उधळून लावला. या प्रकरणात पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 75 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेजण फरार झाले आहेत.
खोपोली | विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नितीन सावंत यांचा पराभव झाल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये काळजी होती की पुढील धोरण काय असेल. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जाहीर होताच ठाकरे शिवसेना अॅक्टीव्ह मोडवर आली आहे. पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत सक्रीय झाले असून त्यांनी खोपोलीत बैठक घेऊन नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.
उरण । आयएएस अधिकारी गौरव दयाळ यांची केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण (जेएनपीए) अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पुढील पाच वर्षांसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत प्रभावी राहणार आहे. संजय सेठी यांच्या कार्यकाळानंतर हे पद दीड-दोन वर्ष रिक्त राहिले होते, त्याऐवजी उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
उरण | जेएनपीए बंदरात विदेशातून बेकायदेशीर पद्धतीने चार कंटेनरमधून आयात करण्यात आलेल्या २३ कोटी रुपयांच्या ई- कचर्याचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) शनिवारी जप्त केला आहे. या प्रकरणी सुरतमधील एका कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे.
महाड | एका दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिला जीवे ठार मारण्याची धमकी देणार्या ३७ वर्षीय नराधमाला एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे. १ ऑक्टोबरच्या दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्यादरम्यान हा प्रकार घडला. पीडित आणि तिचे आईवडील मूळ भोर तालुक्यातील आहेत.
महाड । भोर-महाड मार्गावरील शिरगाव हद्दीत रविवारी मध्यरात्री साडेदोनच्या सुमारास भीषण अपघात घडला. मोरीसाठी रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात कार कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे रस्त्याच्या अपूर्ण कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलादपूर । पोलादपूर तालुक्यातील सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोक ज्ञानू हजारे (वय 66, रा. अंकलखोप, ता. पलुस, जि. सांगली) यांच्याविरोधात आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा 2003-06 या कालावधीत झालेल्या ठेव व्यवहारांसंदर्भात 2018- 2023 च्या लेखापरीक्षकांच्या अहवालानंतर पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे येथे २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ निष्पाप जीवांचा बळी गेला. यामध्ये साखर सुतारवाडी येथे भूस्खलन होऊन सुतारवाडीतील घरेही जमीनदोस्त झाली होती. तेव्हापासून या दरडग्रस्तांची घरासाठी वणण सुरु आहे.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोलापूर | राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री बनवा या मागणी चक्क सोलापूर जिल्ह्यातून मागणी करण्यात आली. एवढेच नाही तर त्यासाठी एका पदाधिकार्याने चक्क रक्ताने पत्र लिहिले आहे. रायगडमधील पालकमंत्री भरत गोगावले यांनाच मिळावे, यासाठी शिवसेना जोर लावून आहे.
नवी दिल्ली | रायगडच्या पालकमंत्रीपदाचा पेच दिल्ली दरबारी पोहचला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि भाजप नेते अमित शहा यांच्यातील चर्चेनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली | स्वच्छ भारत मिशन, शहरी श्रेणीअंतर्गत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’च्या सुपर लीगमध्येमध्य नवी मुंबई तिसर्या स्थानी आहे. इंदूर शहराने सलग आठव्यांदा देशातील सर्वांत स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला. सुरत दुसर्या स्थानी आहे. मुंबईच्या कामगिरीत किंचित सुधारणा झाली असून शहराचा ३३ वा क्रमांक आला.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
नवी मुंबई । नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी ‘एकाला चलो रे’ची भूमिका घेतल्याची माहिती पुढे आली आहे. नवी मुंबईत भाजपचाच महापौर व्हायला हवा, अशी ठाम भूमिका भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासमोर मांडल्याचे समजते.