अलिबाग | महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अध्यादेश, २०२१ अन्वये यावर्षी दि.१ जून ते ३१ जुलै २०२५ (दोन्ही दिवस धरुन ६१ दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय संजय पाटील यांनी केले.
पेण | सावरसई येथे गोवंशीय मास कत्तल करणार्या मुख्य आरोपीला पेण पोलिसांकडून कोपरगाव जिल्हा अहिल्या नगर येथून अटक करण्यात आली आहे. १५ डिसेंबर रोजी सकाळी ६:४४ वाजता पेण-खोपोली मार्गवरील सावरसई गावाच्या हद्दीत टाटा इंट्रा कंपनीच्या टेंम्पोमध्ये गोवंशीय मांस कत्तल करून मांसाची वाहतूक करत असताना आढळून आले होते.
महाड | तालुक्यातील भिसेवाडी येथे आपल्या परसबागेत गांजाची शेती करुन त्याची विक्री करणार्याला महाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तालुक्यातील मोहोत, भिसेवाडी येथील शाम सिताराम भिसे, वय ६१ हा इसम आपल्या परसबागेमध्ये गांजाची बेकायदेशीर शेती करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पनवेल | उलवेमध्ये राहणार्या विवाहितेचा अज्ञात मारेकर्याने भररस्त्यात गळा चिरुन तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना उलवे, सेक्टर-५ मध्ये घडली. या घटनेनंतर मारेकरी पळून गेला असून उलवे पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृत विवाहितेचे नाव अलवीना किशोरसिंग उर्फ अलवीना अदमली खान (२७) असे आहे.
कर्जत | जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये पोशीर आणि शिलार याठिकाणी राज्य सरकार दोन नवीन धरणे बांधणार आहे. यासाठी सुमारे ११ हजार २६३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यतेस मंगळवारी (२० मे) मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
पेण | इंडियन नॅचरल हनीबीज पुणे आणि सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट शिवाजीनगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २० मे रोजी जागतिक मधमाशी दिनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मधमाशी पालन व जनजागृती करणार्या व्यक्तीला मधमाशी मित्र पुरस्कार तसेच जैवविविधतेच्या संवर्धनासाठी दिलेल्या प्रेरणादायी कार्याबद्दल सर्पमित्रांना वन्यजीव मित्र पुरस्कार देण्यात येणार आहे.
माणगाव | तालुयातील बोरघर आदिवासीवाडी येथे मानेवर कोयत्याने वार करून वृद्धाची हत्या केल्याची घटना १८ मे रोजी रात्री ८.४० वाजताच्या सुमारास राहत्या घरासमोर घडली. या घटनेची फिर्याद नातू चंद्रकांत दौलत मुकणे (वय १९, रा. बोरघर आदिवासीवाडी ता.माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेने तालुयात एकच खळबळ उडाली आहे.
बोरघर/माणगाव | मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या सर्व विभागांसाठी एक महत्वकांक्षी १०० दिवसांचा सातकलमी कार्यालयीन सुधारणा विशेष कृती आराखडा उपक्रम हाती घेतला होता. या १०० दिवसांच्या धोरणात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक योजना, विकासाची कामे, अनेक प्रकल्प मार्गी लावण्याची संकल्पना मांडली होती.
पेण | पहेलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना चोख देणार्या भारतीय दिलेल्या जवानांना तसेच त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी १८ मे रोजी पेण शहरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत माजी सैनिकांसह हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता.
महाड | महाड तालुक्यातील एका गावातील पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात सोमवारी, १९ मे रोजी तालुक्यातील हजारो जनता रस्त्यावर उतरली आणि प्रांत कार्यालयावर धडकली. पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा या मोर्चादरम्यान देण्यात आल्या.
पाली | शिक्षण अर्धवट सोडले तरी जर जिद्द असेल, तर यश नक्कीच मिळते याचे जिवंत उदाहरण म्हणजे खारपाले येथील वृषाली पांडुरंग गायकर. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत त्या व त्यांचा मुलगा एकाचवेळी पास झाला असून वृषाली गायकर यांना मुलापेक्षा अधिक टक्के मिळाले आहेत.
मुरुड | बॅ. अंतुले यांचे कोकणातील सागरी महामार्गाचे स्वप्न लवकरच साकार होईल, असा विश्वास खा.सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. या सागरी महामार्गातील अत्यंत महत्वाचा आणि दोन तालुक्यांना जोडणार्या टोकेखार ते तुरुंवाडी पुलाच्या कामाची शनिवारी (१७ मे) तटकरेंनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
21.1k
अलिबाग | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. रविवारी (१८ मे) रायगडात दोन प्रमुख पक्षांचे मेळावे झाले. महाड येथे राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार तर पेझारी येथे शेकाप नेते जयंत पाटील या दोन्ही नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्याचे आवाहन करतानाच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या .निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे महाड येथे राष्ट्रवादीचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मुरुड | होडीतून मुरुडचा जंजिरा किल्ला पाहण्यास जाणार्या पर्यटकांची कसरत लवकरच संपणार आहे. किल्ल्याच्या मागील बाजूस बांधण्यात येणार्या जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात आले असून ब्रेक वॉटर बंधारा ते जेट्टीदरम्यान अॅल्युमिनियम धातूचा एक ४० मीटर लांबीचा पूल उभारण्याचे काम सुरू आहे.
धाटाव | रोहा तालुयातील तांबडी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. हा खटला माणगाव कोर्टात चालला, ८ मे रोजी निकाल जाहीर झाला, मात्र सर्व आरोपी निर्दोष सुटले. कोर्टाने दिलेला निर्णय दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त करत रोह्यातील शेकडो महिलांसह नागरिकांनी मंगळवारी (१३ मे) पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी राम मारुती चौक ते तहसीलदार कार्यालय असा जनआक्रोश मोर्चा काढत संतापाला वाट करुन दिली.
खारी/रोहा | महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना संलग्न रोहा तालुका शाखेच्या माध्यमातून कृषी सहाय्यक संघटनेच्या कार्यकारी पदाधिकारी वर्गाने उपविभागीय कृषी अधिकारी शुभम बोराडे आणि रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांना आपल्या प्रलंबित विविध न्याय हक्काच्या मागण्यांसाठीचे निवेदनाद्वारे ५ मेपासून ते १५ मेपर्यंत विविध स्तरावर आंदोलन पुकारल्याचे नमूद केले आहे.
श्रीवर्धन | सतत बदलत असलेले हवामान, कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण यामुळे उष्म्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. वास्तविक पाहता श्रीवर्धन मधील तापमान ३२ किंवा ३३ अंश सेल्सिअस इतकेच असते. परंतु हवेतील सापेक्ष आर्द्रता वाढल्यामुळे हे तापमान ३८ ते ४० सेल्सिअस असल्याचे जाणवते. प्रचंड उष्म्यामुळे या ठिकाणचे स्थानिक नागरिक हैराण झाले असून, घामाने अक्षरशः अंघोळ होत आहे.
बोर्लीपंचतन | श्रीवर्धन तालुयातील बोर्लीपंचतन गावाला पाणी पुरवठा करणार्या कार्ले नदी लगत असणार्या विहिरींच्या परिसरातील नदी पात्रामध्ये अवैधरित्या खोल खड्डे खणून रेजग्याचा उपसा होत असल्याने नदीपात्रातील पाणी गढूळ होण्याबरोबरच नदीपात्रालगत गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या विहिरींमधील पाण्याची पातळीसुध्दा कमी होत असून पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे.
म्हसळा | जळगाव-पुणे-माणगावम्हसळा-दिघी या राष्ट्रीय महामार्ग क्रं. ऋ.७५३ वर माणगावहून म्हसळ्याकडे येत असताना १९ व्या कि.मी. मध्ये घोणसे घाटातील तीव्र वळण आणि शीघ्र उताराच्या अपघात प्रवण रस्त्यावर १७ मे रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास १६ चाकी अवजड टे्रलरला अपघात झाला.
म्हसळा | महामार्गांवर मोकाट गुराुंळे होणार्या अपघातांचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर अशाच एका अपघातात म्हसळा तालुयातील घोणसे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश धोंडू कानसे (वय ४८) गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी (१५ मे) त्यांचे निधन झाले. १२ मे रोजी सरपंच रमेश कानसे हे गावची मिटींग आटोपून बुलेट गाडीने म्हसळा शहरातील निवासस्थानी परतत होते.
पनवेल | जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांना उद्ध्वस्त करून समाचार घेतला. त्या अनुषंगाने ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी मोहिमेतील भारतीय सशस्त्र दलाच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने १८ मे रोजी पनवेलमध्ये ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली.
राबगाव/पाली | प्रत्येक गोरगरिबाच्या डोक्यावर स्वतःचे छप्पर असावे, यासाठी शासन घरकुल योजनेची अंमलबजावणी सर्वत्र करीत आहे. सुधागड तालुक्यातील चिवे ग्रामपंचायत हद्दीतील खुरावले आदिवासी वाडीतील सहा कुटुंबांनीही आपले राहते घर पाडून त्याठिकाणी मंजूर घरकुलांतर्गत बांधकामाला सुरुवात केली. मात्र ग्रामसेवकाने संबंधित कुटुंबांना तांत्रिक अडचणीचे कारण देत घरकुलाच्या कामाचे बिल थांबविल्याने या कुटुंबांवर पावसाच्या तोंडावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
कर्जत | कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली धरणात बुडून दोन पर्यटक तरुणांचा मृत्यू झाला. मुंबई गोवंडी येथील हे तरुण रविवारी (१८ मे) सकाळी धरणात आंघोळीसाठी उतरले असताना ही घटना घडली. स्थानिक आदिवासी तरुणांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, धरण परिसरात प्रवेशबंदी असतना, पर्यटक याठिकाणी येत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
खोपोली | पटेलनगर, मिळगांव आदिवासीवाडीत तीन बांगलादेशी महिला आणि आश्रय देणार्या महिलेला खोपोली पोलिसांनी गुरुवारी, १५ मे रोजी अटक केली आहे. या तिन्ही बांग्लादेशी महिला दहा दिवसांपूर्वी खारघर येथून खोपोलीत वास्तव्यासाठी आल्या होत्या. त्यांना आश्रय देणारी महिलाही बांग्लादेशी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून अटक केलेल्या महिलांना २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खोपोली | गेल्या आठवड्यांपासून दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. दिवसभर कडक ऊन व अचानक दुपारी तीन ते चारनंतर पडणारा पाऊस स्थिती आहे. खोपोली शहरातील रस्त्यावरांवर पाणी साठत असतानाच १४ मे रोजी संध्याकाळी ४ वाजता मुसळधार अवकाळी पाऊस पडल्यामुळे शास्त्री नगर हद्दीतील गिरनार बिल्डींगसमोरील गटार तुंबून रस्त्यावर तळे बनले होते.
उरण | बंदी असतानाही करंजा बंदर परिसरात एलईडी पद्धतीने मासेमारी करणार्या दोन बोटींवर मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकार्यांनी ९ मे रोजी छापा टाकून कारवाई केली. यावेळी दोन बोटीवरील थ्री फेज जनरेटर ४ हजार, ३ हजार वॅट एलईडी बल्ब जप्त करण्यात आले आहे.
उरण | पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचाच भाग म्हणून अतिमहत्त्वाच्या ठिकाणी बुधवारी (७ मे) मॉक ड्रिल करण्यात आले. यात उरणमधील सात ठिकाणी ‘ऑपरेशन अभ्यास’ करण्यात आला.
पोलादपूर | पोलादपूर शहरातील आनंदनगर येथे राहणार्या वैभव पालकर यांचा ४ मे रोजी कामावरून घरी येत असताना सकाळी पावणेआठच्या सुमारास लोहारे गावच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. अज्ञात आयशर ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मात्र या अपघातानंतर आयशर चालक हा पसार झाला होता. त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातून एक वीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. अक्षरा शुभम पवार असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव असून ती सध्या गोकुळधाम सोसायटीच्या मागे राहत होती.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तळे | रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन खा.सुनील तटकरे आणि शिवसेना आमदारांमधील दुरी कमी होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिने तोंड न पाहणारे हे नेते आता हळूहळू एका व्यासपीठावर येऊ लागले आहे. आ. थोरवे, आ. दळवी यांच्यानंतर मंत्री भरत गोगावले हेदेखील तटकरेंसोबत एकत्र पहायला मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांमध्ये दिलजमाई झाली का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
पुणे | भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या एसटीच्या स्मार्ट बसेस घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. नुकतंच एसटी प्रशासनाने नव्या ३ हजार बसची खरेदी केली.
नवी दिल्ली। न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपला. त्यांच्यानंतर न्यायमर्ती गवई यांचे नाव ज्येष्ठता यादीत होते. न्यायमूर्ती खन्ना यांनी त्यामुळे त्यांचे नाव पुढे केले.
इंदूर | इंदूर हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एकेकाळी शहरात भिकार्यांची संख्या पाच हजार होती. इंदूरसह देशातील १० शहरे भिकारीमुक्त करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. एखादं शहर भिकारीमुक्त होऊ शकतं, असं म्हटलं तर कदाचित तुचा विेशास बसणार नाही.
रत्नागिरी | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लागून असणार्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी निधी लागणार असेल तर, कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी सामंजस्य करार करावा. रत्नागिरीसह कोकणातील रेल्वे स्थानक जगातील चांगली रेल्वे स्थानके करु, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
रत्नागिरी | महायुती सरकारमध्ये खातेवाटप करण्यात आले. यानंतर आता महायुती सरकारमध्ये पालक मंत्रीपदावरू न रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत असतानाच, रत्नागिरीचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळावे अशी इच्छा योगश कदम यांनी व्यक्त केली आहे.
कोकणातील सवारचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सर्वत्र धामधूम सुरू झाली आहे.
नवीन पनवेल | महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात या पोलीस उपनिरीक्षकाच्या आईलाही सहआरोपी करण्यात आले आहे. मार्च २०२० मध्ये पोलिस उपनिरीक्षकाची ओळख तो तळोजा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना पीडित महिला पोलिसासोबत झाली.
मुंबई | ग्रामपंचायत,जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढवायची असल्यास, त्या व्यक्तींनी जातीचे प्रमाणपत्र आणि पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
मुंबई | राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची आज बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत कृत्रिम वाळू धोरणाविषयी मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पर्यावरण नुकसान टळणार आहे. तर वाळूच्या माध्यमातून ग्रामीण भागात पसरलेल्या गुंडगिरी आणि वाळू माफियाना मोठा दणका बसला आहे.