कर्जत | नेरळ परिसरातील उल्हास नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रचित दत्तात्रय देशमुख (वय १७, रा.सवणे, ता.खालापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. नुकताच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला प्रचित सुट्टीच्या निमित्ताने नेरळ येथे आपल्या मावशीकडे आला होता.
धाटाव | रोहा शहराला लागून वाहणार्या बारमाही कुंडलिका नदीत सोमवारी (१८ मे) दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरतीच्या पाण्यात नदीत एक मृतदेह तरंगत असल्याचे पुलावरुन जाणार्या नागरिकांच्या निदर्शनास आले.
अलिबाग | रायगड जिल्हा परिषदेची विशेष सभा सोमवारी (१८ मे) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत १५व्या वित्त आयोगांतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना वाटप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अंतिम आराखड्यास उपस्थित सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापतींच्या अनुमतीनंतर मंजुरी देण्यात आली.
बेणसे | पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पेडली गावाच्या हद्दीत सोमवारी (१८ मे) पहाटे भीषण रस्ता अपघात होऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. कार आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या जोरदार धडकेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
अलिबाग | महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून एकूण १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सर्व जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील असून मतदान १८ जून रोजी होणार आहे. अर्ज भरण्याची मुदत २५ मे ते १ जून अशी निश्चित करण्यात आली आहे.
उरण | न्हावा शेवा बंदर परिसरात कंटेनरमधील माल चोरीचे रॅकेट पुन्हा एकदा उघडकीस आले असून बेंगलोरहून एक्स्पोर्टसाठी आणलेल्या कंटेनरमधून तब्बल १३ लाख ५६ हजार ५७७ रुपयांचे १,१७० लेडीज ड्रेस लंपास झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे कंटेनर बंद अवस्थेत यार्डमध्ये दाखल झाला होता.
म्हसळा | दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात रविवारी (१७ मे) दुपारी डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टँकरमधून मोठ्या प्रमाणात डिझेलची गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अलिबाग | रायगड जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालून "शून्य मृत्यू”चे उद्दिष्ट गाठण्यासाठी आता प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा, अन्यथा संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिला.
अलिबाग | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्वतः सायकलवरुन कार्यालयात येत इंधन बचतीचा संदेश दिला. बुधवारी (१४ मे) सकाळी आंचल दलाल या शासकीय वाहनाऐवजी सायकलवरुन कार्यालयात दाखल झाल्या.
मुरुड-जंजिरा | मुरुड तालुक्यातील एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ५२ वर्षीय इसमाने हे कृत्य केले असून, त्याला तातडीने अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरूड | मुरूड-अलिबाग मार्गावरील सर्वे गावाजवळ मोरीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी पडून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅड. महेश मोहिते यांनी मागणी केल्यानंतर संबंधित ठेकेदाराविरुद्ध मुरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
माणगाव | एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित क्षमतावाढी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि एनटीपीसी यांच्यात सुधारित सामंजस्य करार करण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये १८०० मेगावॅटवरुन २६०० मेगावॅट इतकी वाढ होणार आहे.
माणगाव । माणगाव तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर अवैधरित्या सोलिव खैर लाकूड वाहतूक करणार्या वाहनावर वनविभागाने धाडसी कारवाई करत सुमारे 18 लाख 69 हजार 309 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित वाहनचालकाविरोधात वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे अवैध खैरतोड करणार्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.
रोहा | रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील डंम्पिंग ग्राऊंड परिसरात काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागून एका कर्मचार्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
अलिबाग | बाळाच्या जन्मानंतर काही तासांतच मातेचा मृत्यू झाल्याची दुर्दैर्वी घटना अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. विवा दुर्गवले असे या मातेचे नाव असून ती मूळची श्रीवर्धन येथील राहणारी होती. नवजात बाळ सुखरुप आहे. मात्र एका माऊलीचा करुण अंत झाल्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
श्रीवर्धन । श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला समुद्र किनारी भलेमोठे ग्रीन सी टर्टल चिखलात अडकून पडल्याचे आढळून आले. रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर प्रथमच अशाप्रकारचा नर ग्रीन सी कासव आढळला असल्याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांनी दिली.
म्हसळा | राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार म्हसळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ११ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुका तर ३ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार, तहसिलदार कार्यालयाद्वारे निवडणुकीची नोटीस ३० मार्च रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
पेण | थोर समाजसुधारक डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त पेण तालुक्यातील श्री सदस्यांनी पेण शहरात भव्य स्वच्छता मोहीम राबवत सुमारे १५ टन कचरा गोळा केला. या उपक्रमात तालुक्यातील १५ बैठकांमधील एकूण ९७० श्री सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
पेण | बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. "कोरा झालेला सातबारा मूळ मालकांच्या नावे परत मिळावा” या प्रमुख मागणीसाठी शेतकर्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.
पनवेल | सार्वत्रिक निवडणुकांनंतर आगामी काळात पनवेल परिसरात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ज्येष्ठ शिवसैनिक दीपक निकम यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी तर नव्या दमाचे युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले अॅड. समाधान काशीद यांची नवे पनवेल महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाकडून प्रति गुंठा सव्वा दोन लाखांची कपात; शेतकरी संतप्त
पाली/वाघोशी | रायगड जिल्ह्यातील होळी सण या वर्षी सामाजिक व सेवाभावी पद्धतीने साजरा करण्यात आला. अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांमुळे तसेच दानशूर नागरिकांच्या सहकार्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांच्या माध्यमातून शेकडो पुरणपोळ्या आदिवासी वाडी, झोपडपट्टी आणि वृद्धाश्रमातील गरजूंना वाटण्यात आल्या.
कर्जत । कोरोना काळात कर्जत रेल्वे स्थानकावर बंद करण्यात आलेले रेल्वे गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर असोसिएशनकडून सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली असून, कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
खोपोली | खोपोली नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (१३ मे) शहरातील विविध विकासकामांच्या अजेंड्यावर पार पडली. मात्र या सभेत केवळ विकासकामांवर चर्चा न होता, प्रशासकीय कामकाजात काही कार्यकर्ते आणि नगरसेविकांच्या पतींकडून होत असलेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करण्यात आला.
खालापूर | खालापूर तालुक्यातील इर्शाळगडावर ट्रेकिंग गेलेल्या एका तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. आकाश वाघमोडे (वय २६) असे या तरुणाचे नाव असून तो भिवंडी येथील रहिवासी होता. आकाश रविवारी (१२ एप्रिल) इर्शाळगडावर सोलो ट्रेकिंगसाठी आला होता.
उरण । मुंबईजवळील जागतिक वारसा स्थळ घारापुरी (एलिफंटा) लेणी परिसरातील मोरा बंदर येथे सुरू असलेल्या उत्खननात महत्त्वपूर्ण शोध लागला असून, यामुळे या बेटाच्या प्राचीन व्यापारी इतिहासावर नवे प्रकाशझोत पडले आहेत.
महाड | ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी वर्ष प्रारंभ झाले असून हे वर्ष महाराष्ट्र शासन समता व समरसता वर्ष म्हणून साजरे करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाड येथे केली.
चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९ व्या वर्धापन दिनासाठी...महाडमध्ये आज भीमसागर उसळणार !
पोलादपूर | कशेडी बोगद्याजवळ एका भरधाव स्विफ्ट कारवरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने कारमधील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या, त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पोलादपूर । आंबेनळी घाटात वळणदार व तीव्र उताराच्या ठिकाणी टाटा नेक्सन कार सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने कारमधील दहा वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्वांचे प्राण वाचविण्यात यश आले.
तळा । तळा नगरपंचायतीस 13 कोटी 81 लाख रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी देण्यात आला असून शहरातील उर्वरित कामांसाठी आणखी 6 कोटी रुपये देण्यात येतील. तसेच तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी रुपयांचा निधीही देणार असल्यो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
भंडारा | प्रशासकीय इमारत झाली पण,टेबलाच्या खालून जर कोणी पैसे घेणार असेल तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक कॅबीनला सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि ते कलेक्टरच्या चेंबरला सर्विलेन्सनं जोडा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
कोलकत्ता | टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीतील सामन्यात टीम इंडियाने दबावाखाली दमदार कामगिरी करत वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला. १९६ धावांचं आव्हान समोर असताना क्षणभर सामना विंडीजच्या बाजूने झुकला होता, मात्र संजू सॅमसनच्या तुफानी खेळीने भारताने खेळाचा चेहरामोहराच बदलला.
नवी दिल्ली । राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या निवडणुका 31 जानेवारी ऐवजी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
नवी मुंबई | नवी मुंबई गुन्हे शाखेने नेरुळ परिसरातील ‘द ब्लेसफुल स्टे’ या लॉजवर मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली असून, या कारवाईत चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई । नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात रविवारी दुपारी तुफान हाणामारीची घटना घडली असून, ओला-उबेर चालकांकडून, खाजगी चालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई | राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगाने मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्ययावत ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार असून, या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया अवघ्या ८ तासांत पूर्ण होणार आहे.