कळंबोली | गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच कळंबोली शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहराची दैनंदिन पाण्याची गरज सुमारे ३० दशलक्ष लिटर असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून गेल्या काही दिवसांपासून केवळ १७ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत आहे.
अलिबाग | रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६-२७ जाहीर करण्यात आले असून जिल्ह्यातील १५ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
अलिबाग | मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सीच्या भाडेदरात वाढ केल्यानंतर नवीन दर भाडेमीटरमध्ये लागू करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
कळंबोली | कामोठे येथे शाळेतून घरी परतणार्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर खासगी स्कूल बसच्या चालकाने बसमध्येच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी बसचालक इस्का आरगुम यादव (रा. सेक्टर-३, कळंबोली) याला अटक केली आहे. या घटनेमुळे पनवेल-कामोठे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
कर्जत | खालापूरातील कामगारांच्या प्रश्नावरुन काढण्यात येणारा महाएल्गार मोर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याने स्थगित केला. मात्र आमच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यास ११ सप्टेंबर रोजी एक लाखांचा मोर्चा धडकणार, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिला.
उरण | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने व्यावसायिक विमानसेवा सुरू केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच ३० लाख प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. २५ डिसेंबर २०२५ रोजी व्यावसायिक विमानसेवा सुरू झाल्यानंतर मिळालेला हा प्रतिसाद नवी मुंबई विमानतळाच्या वेगाने होत असलेल्या विस्ताराची साक्ष देणारा ठरला आहे. विमानतळावरून सध्या ४६ गंतव्यस्थानांशी हवाई जोडणी झाली असून, सुरुवातीला असलेली १३ गंतव्यस्थानांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
खालापूर | खालापूर येथील स्वामी समर्थ मठात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून लाकडी पादुका आणि चांदीचे आवरण असा एकूण १ लाख ६० हजार ५२२ रुपये किमतीचा ऐवज चोरी करून पोबारा केल्याची २ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
अलिबाग | अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील विजय थळे यांच्या हत्येप्रकरणी दोनजणांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. निकेश दळवी आणि आशिष दळवी अशी त्यांची नावे असून बहिरोळे येथील ते रहिवासी आहेत. दगडखाणीच्या वादातून थळे यांची त्यांनी हत्या केली. दोघांनाही न्यायालयाने ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महाड | सगळे झाले, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेही येऊन गेले; पण मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (३ सप्टेंबर) त्यांनी महामार्गाची पाहणी केली. यानंतर त्यांनी महामार्ग पूर्ण करण्यासाठी जानेवारी २०२७ ही नवी डेडलाईन जाहीर केली आहे.
अलिबाग | पावसाळ्यातील तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा-अलिबाग जलवाहतुक सेवा आजपासून (१ सप्टेंबर) सुरू होणार आहे. त्यामुळे जलमार्गावरुन प्रवास करणार्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मुंबईला अलिबागशी जोडणारा हा सागरी मार्ग वेळेची बचत करणारा आणि सोयीचा पर्याय मानला जातो.
अलिबाग | अलिबाग तालुक्यातील वायशेत येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून घरासह दुकानाचे मोठे नुकसान झाल्याची घटना सोमवारी (३१ ऑगस्ट) घडली. या घटनेत संदीप पाटील यांच्या पत्नी सायली संदीप पाटील जखमी झाल्या असून, त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कर्जत | तालुक्यातील बारणे गावातील २३ वर्षीय तरुणाचा दुचाकीला गाय धडकल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना २६ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास तिवरे मराठी शाळेजवळ घडली. या घटनेने बारणे गावावर शोककळा पसरली आहे. बारणे गावातील २३ वर्षीय तरुण हा मित्रासोबत दुचाकीवरून तिवरेकडून कर्जतच्या दिशेने येत होता.
कोर्लई | राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळातर्फे साळाव-मुरुड रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, नांदगाव येथील नागेेशर नगर ते आयुष हॉस्पिटलदरम्यान साईडपट्टी भराव करताना रस्त्यावर आलेली खडी-माती वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.
दिघी | श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे येथील समुद्रकिनारी असलेल्या शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे, अवैध बांधकामे आणि अनधिकृत असेसमेंटचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बुधवारी (२६ ऑगस्ट) झालेल्या ग्रामसभेत असेसमेंट उतारे देताना आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
माणगाव | मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बायपासची एक बाजू गणेशोत्सवापासून सुरु करण्याची मंत्र्यांनी केलेली घोषणा हवेत विरण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला असून, चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरु केली आहे.
माणगाव | रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या राष्ट्रवादीविरोधातील वक्तव्याला राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
तळा | महागाव पंचक्रोशीतील विनवली फाटा ते कोरखंडा फाटा या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थी, प्रवासी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
रोहा | कुंडलिका नदीत राफ्टिंग करताना बोट पाण्यातील झाडाला अडकून उलटल्याने नदीत पडलेल्या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना रोहा तालुक्यातील धगडवाडी गावाच्या हद्दीत ११ जुलै रोजी घडली होती.
श्रीवर्धन | शहरातील बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी प्रभावीपणे राबवली जात नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. काही व्यापारी पर्यावरणाची काळजी घेत ग्राहकांना कापडी किंवा कागदी पिशव्या देत असले, तरी काही दुकानदारांकडून ग्राहकांना खुलेआम प्लास्टिकच्या कॅरीबॅग दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
स्मार्ट मीटरचा शॉक! सहा बाय आठच्या टपरीला ५ हजारांचे बिल!
म्हसळा | म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.
उरण | उरण शहरासह द्रोणागिरी परिसरात रस्त्यावर मोकाट फिरणार्या जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून, मोकाट बैलाने स्कूटीला दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी (२४ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास घडली.
पेण | गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस उरले आहेत. मूर्ती कारखान्यांमध्ये अंतिम टप्प्यातील कामाला वेग आला आहे. गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून देशभरात लौकिक असलेल्या पेणमधून सुमारे ३० लाख गणेशमूर्तींची विक्री झाली असून यातून साधारण १०० कोटी रुपयांच्या उलाढालीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पेण | पेण उपविभागीय समितीकडे गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेले वनहक्क दावे, दळीधारक व मयत दावेदारांच्या वारस नोंदी, ई-केवायसी आणि फार्मर आयडीअभावी शासकीय योजनांपासून वंचित राहणार्या आदिवासींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पेण तालुयातील बरडावाडी येथे आदिवासींचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.
पनवेल | अमेरिकेतून पर्यटनासाठी भारतात आलेल्या ४२ वर्षीय परदेशी पर्यटकाची सुमारे ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली बॅग पनवेल तालुक्यातील नावडे गावाजवळ चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल | गणेशोत्सवाला अवघे तीन आठवडे शिल्लक असताना पनवेल शहरात उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. विविध गणेश मंडळांकडून सजावट, विद्युत रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनाला वेग आला आहे.
सुधागड-पाली | पाली-खोपोली महामार्गावरील रासळ आणि कानसळ परिसरात मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, या गुरांनी महामार्गावर अक्षरशः ठाण मांडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. रस्त्याच्या मधोमध कळपाने गुरे उभी राहत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.
पाली | पाली बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणार्या तरुणाला पाली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५०० रुपये दराच्या तब्बल ४१ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी या बनावट नोटांचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने पाली बाजारपेठेतील व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
खोपोली | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी (७ ऑगस्ट) मध्यरात्री भरधाव फॉर्च्युनर कारने मालवाहू पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तुषार भूमकर (रा. वाकड, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चारजण जखमी झाले आहेत.
खोपोली । खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध केपी वॉटरफॉल येथे वर्षासहलीसाठी आलेल्या ठाण्यातील चार मित्रांपैकी एका तरुणाचा निसरड्या ठिकाणी पाय घसरून सुमारे 40 ते 45 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (2 ऑगस्ट) सायंकाळी घडली.
उरण | रेवस-करंजा पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून, या कामासाठी धावणार्या अवजड वाहनांमुळे रेवस-करंजा मार्गावरील वाहतूक आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुलाच्या कामासाठी क्रेन, बल्कर, डंपर, बोल्डर वाहने, रोलर्स, कंटेनर आणि पाण्याच्या टँकरची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
महाड | महाड शहरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, देशी-विदेशी दारूची अवैध वाहतूक करणार्या एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत दारूच्या बाटल्यांसह दुचाकी असा एकूण ७७ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलादपूर | सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य दरड दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
पोलादपूर | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (३० मे) दुपारी पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात दापोली येथील माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालवत असलेले वडील गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
तळा । तळा नगरपंचायतीस 13 कोटी 81 लाख रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेसाठी देण्यात आला असून शहरातील उर्वरित कामांसाठी आणखी 6 कोटी रुपये देण्यात येतील. तसेच तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी रुपयांचा निधीही देणार असल्यो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
कोल्हापूर । कागल तालुक्यातील सुळकूड येथे टेरेसवर खेळत असताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने 9 वर्षीय शर्विल सागर महादेव याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नवी दिल्ली | सीबीएसईने नववी इयत्तेपासून तीन भाषा धोरण लागू करू नये. "नववी इयत्तेत शिकणे आधीच कठीण आहे, मग त्यात तिसर्या भाषेचा समावेश करण्याची काय गरज आहे?” अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली.
भंडारा | प्रशासकीय इमारत झाली पण,टेबलाच्या खालून जर कोणी पैसे घेणार असेल तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक कॅबीनला सीसीटीव्ही कॅमेरे लावा आणि ते कलेक्टरच्या चेंबरला सर्विलेन्सनं जोडा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत.
रत्नागिरी | स्थानिक स्वराज संस्थांमधून निवडल्या जाणार्या कोकणातील जागेसाठी शेवटच्या दिवसापर्यंत सहा जणांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. यात महायुतीकडून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, महाआघाडीकडून बाळ माने तर शेकापकडून अरविंद म्हात्रे यांचा समावेश आहे.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
नवी मुंबई | पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटविल्याच्या प्रकरणावरून मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर मनसेने राज्य सरकारवर जोरदार टीका केली असून, ‘हा कसला न्याय?’ असा सवाल उपस्थित केला आहे.